जव्हार (पालघर) : नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सहा जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील स्वयंसहायता गटांना, ग्रामसंघांना व विविध उपजीविका कार्यक्रमांना भेट दिली. ‘उमेद’ या राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, वर्ल्ड बँकेच्या सल्लागार मेघना फणसळकर, ‘एमएसआरएलएम’चे उपसंचालक रघुवीर सोमवंशी, पालघर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक घाणेकर, ‘जीवनोन्नती’चे योजेश भामरे, एचआर मॅनेजर रामदास धुमाळ, जव्हारचे गटविकास अधिकारी पठारे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत स्वयंसहायता गटांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी अवजारे देण्यात येतात. या योजनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच या वेळी शिरोशी येथे त्यांच्या हस्ते मोगऱ्याचे रोप लावण्यात आले.